महाराष्ट्रराजकीय

येरगी येथे मन की बात कार्यक्रम उत्साहात संपन्न

देगलूर (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतात. हा कार्यक्रम सर्व बुथ स्तरावर आयोजित करण्याच्या निर्देशानुसार देगलूर तालुक्यातील येरगी येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन येरगीचे सरपंच संतोष पाटील यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील, गोजेगावकर, प्रदेश कार्यकारी सदस्य तथा दिव्यांग प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, लक्ष्मण ठक्करवाड, जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील माळेगावकर, तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंटे, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, अनिल पाटील खानापूरकर, नायब तहसीलदार सुरणर पंचायत समिती विस्तार अधिकार सुर्यवंशी, ग्रामसेवक संजय राऊत, तलाठी प्रा.उत्तम कांबळे, शिवकुमार देवाडे जि.चिटणीस तथा मन की बात संयोजक येरगी गावचे सरपंच संतोष पाटील, ग्रा.पं.सदस्य, भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे