श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे “निरोप समारंभाचे आयोजन”
जामनेर : जामनेर पासून अवघ्या २ मैल अंतरावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पळासखेडे बु. येथे १८ जून २०२२ रोजी अंतिम वर्ष बी. फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. मयूर आर. भुरट, डी. फार्मसी विभाग प्रमुख, प्रा. सुनील आर. बावस्कर आणि महाविद्यालयाचे उप-प्राचार्य, प्रा. प्रफुल्ल पी. पाटील मंचावर उपस्थित होते.
मनोजकुमार कावडीया यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये असणारे शिक्षणाचे महत्त्व सांगून महाविद्यालयातुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. मयूर आर. भुरट यांनी अद्याप जमलेल्या आठवणी सांगितल्या, विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि महाविद्यालयातुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. सुनील आर. बावस्कर यांनीही भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि महाविद्यालयातुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान “रेझोनन्स २K२२” (वार्षिक स्नेह-संमेलन) मधील विविध उपक्रमातील विजेते आणि उपविजेते यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या GPAT पात्रता धारकांनाही विशेष मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. दरम्यान “मेगा कॅम्पस ड्राईव्ह- २०२२” मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले.
काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या सोनेरी आठवणी सांगितल्या. महाविद्यालयातुन बाहेर पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मनोरंजनपर विविध उपक्रम केले आणि महाविद्यालयाची आठवण म्हणून त्यांना मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. शेवटी तृतीय वर्ष बी. फार्मसी मधील निलेश नाईक या विद्यार्थ्याने आभार मानले.
प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रुपल एम. भुरट व प्रा. भुषण पी. गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम पहिले. या निरोप समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.