महाराष्ट्रराजकीय

खानापुर सर्कलच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी गाठले मंत्रालय

देगलुर (मारोती हणेगावे) देगलुर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडिला, काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर या निवडणुकीत नऊ सर्कल पैकी खानापूर सर्कल सर्वाधिक लीड दिल्यामुळे या लीडचे श्रेय खानापुर सर्कलचे प्रभारी जिल्ह्याचे नेते चव्हाण यांचे अत्यंत बालाजीराव पाटील पांडागळे यांच्या नेतृत्वामुळे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जिल्हा परिषद शिक्षण स्वीकृत सदस्य बसवराज पाटील वन्नाळीकर, तडखेल नगरीचे सरपंच सुनील पाटील तडखेलकर, खानापुरचे माजी सरपंच चिरंजीव शिवकुमार ताडकोले, या तिघांनी सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठि पांडागळे यांच्या नेतृत्व मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची त्यांच्या मुंबईतील मेघदूत या निवासस्थानी जाऊन खानापूर सर्कलमधील सर्वांच गावांचा समावेश करून सविस्तर अशी चर्चा करून मोठी निधी देण्यात यावी यावर त्यांनी संबंधित विभागांना तसे पत्र दिले व सकारात्मक असा प्रतिसाद दिला.

तसेच निवांत पणे वेळ दिले व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसी, एसटी प्रमाणेच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय गणवेश मोफत देण्यात यावी या मागणीचे निवेदन सुद्धा त्यांनी चव्हाण यांना दिले. खानापुर सर्कलच्या विकासासाठि कार्यकर्त्यांनी मंत्रालय गाठले त्यावेळेस त्यांना मंत्रालयामध्ये विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर, देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्वतोपरी मदत दिली. जनतेच्या विकासामध्ये नेहमी अग्रेसर रहा तुम्हाला वाटेल ती मदत दिली जाईल असे शब्द त्यांनी दिले. यामुळे जनतेच्या अपेक्षा ह्या निष्ठावान कार्यकर्ता कडून वाढलेल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे