महाराष्ट्र

विनायक सहकारी साखर कारखाना चालू करा ; शेतकऱ्यांची मागणी

वैजापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील ऊस लागवड शेतकऱ्यांना वाली कोण? ऊस लागवड शेतकऱ्याची व्यथा सहकारी कारखाना मृतावस्थेत गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पाऊस भरपूर असून सुद्धा शेतकरी ऊस लागवडी पासून वंचित काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून सुद्धा नोंदणी केलेले कारखाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. ऊस तुटत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

लाखो रुपये खर्च करून ऊस पिकवला. पण त्याला आता तोड मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. म्हणून बेंदवाडी परसोडा शिवराई बोरसर पानगव्हाण येथील शेतकऱ्यांची मागणी आहे की, विनायक सहकारी कारखाना मृत अवस्थेतून काढून शेतकऱ्यांचा स्वाधीन करावा नाहीतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन विकून उदाहरण निर्वाह करावा लागेल. ऊस तोड कामगार यांना १० हजार रुपये देऊन सुद्धा तोडून मिळत नाही. त्याचप्रमाणे शेजारील तालुक्यातील कारखाने कवडीमोल भावाने ऊस मागत आहे तरी शेतकऱ्यांनी विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावी अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे