महाराष्ट्र
वैजापूर तालुक्यातील सैजतपूर जळगाव अवैद्य वाळू उपसाला कोण घालणार लगाम ?

वैजापूर : तालुक्यातील शिवना नदीच्या काठाला वसलेले सैजतपूर जळगाव अवैद्य वाळूचा उपसा चोरटयांनी केला. मात्र कोण आळा घालणार ?, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिवना नदी पात्रात अवैद्य वाळू उपशाचा सुळसुळाट वाळू चोरट्यांनी नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस वाळू चोरून वाहतूक करत होते. आता तर कमालच झाली दिवसा वाळू वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी याला कोण आळा घालणार ?, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसा तीन ते चार वाजेपासून वाळू उपसा होत असल्यामुळे वाहनांच्या त्रासाला गावकरी कंटाळले आहे व वाळू चोरटे हे वाळूने भरलेली गाडी किंवा ट्रॅक्टर कुणी पकडू नये म्हणून बेधुंद अवस्थेत चालवतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका असून वाळू वाहतूक चालू असतानाही याला कोणीही आळा घालत का नाही? असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.



