महाराष्ट्रराजकीय

गोपीचंद पडळकर ठाकरे सरकारवर संतापले ; म्हणाले, ‘अन्यथा संघर्ष अटळ’

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला असून ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही हे ध्यानात घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे,” असा इशारा गोपीचांद पडळकर यांनी दिला आहे.

“चौंडीचे प्रशासन प्रस्थपितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही. बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही हे ध्यानात घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे,” असा इशारा गोपीचांद पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्रही शेअऱ केलं आहे. कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “हिंदू संस्कृतीच्या जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी चौंडी येथे दिमाखात साजरी केली जाते. चौंडी येथील जयंतीचा कार्यक्रम सर्वपक्षीय सर्व जातीधर्माच्या लोकांचा असतो. लाखो लोक येथे आपल्या मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. ह्या वर्षीदेखील ३१ मे रोजी जनसमुदाय येणार असून त्या जनसमुदायास मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती”.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे