महाराष्ट्र
सिक्किममध्ये भीषण अपघात ; ठाण्यातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : सिक्कीममध्ये गेलेल्या ठाण्यातील नागरिकांच्या गाडीचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे चार सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (२८ मे) विमानाने सिक्कीमला गेले. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. मात्र, प्रवास ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं
सुरेश पन्नालालजी पुनमिया, तोरल सुरेश पुनमिया, हिरल सुरेश पुनमिया, देवांश सुरेश पुनमिया, जयन अमित परमार. सोमवारी (३० मे) अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह ठाण्यात आणले जाणार आहेत.



