महाराष्ट्र

नाशकात शास्त्रार्थ सभेत राडा ; महाराजांवर उगारला माईक

नाशिक : नाशिकमध्ये आज हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेत, साधु महंतांमध्येच आसन व्यवस्थेवरुन जोरदार वाद झाला आहे. शिवाय या सभेत महाराजांनी एकमेकांवर माईक देखील उगारला आहे.

हनुमान जन्मस्थळावरुन वाद चिघळल्याचं चित्र दिसून येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महंतांमध्ये वाद झाल्याचाएक व्हिडीओही समोर आला आहे. यात तुलसीदास महाराज समोरच्या महंतांवर माईक उचलून मारताना दिसत आहे. यानंतर समोरचे महंत संतापले आणि उभे राहिले.

हनुमान जन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी आज नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वी शास्त्राने उत्तर देण्याचे गोविंदगिरी महाराजांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार या सभेला देशभरातील विविध धर्मपीठाचे 25 ते 30 प्रतिनिधी उपस्थित आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की, किष्किंदा यावरुन सध्या नाशिकमध्ये महंतांमध्ये वाद सुरू आहे.

किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला होता.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे