महाराष्ट्र

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू ; भर पावसात नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर (वृत्तसंस्था) व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी भर पावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

करवीर तालुक्यातील उचगाव येथील ओमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटरवर लावला होता. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याने गेले वर्षभर घरातच उपचार सुरू होते. थकित वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या व कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांमधून होत आहे. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय आवारात भरपावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे