वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू ; भर पावसात नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
कोल्हापूर (वृत्तसंस्था) व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी भर पावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
करवीर तालुक्यातील उचगाव येथील ओमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटरवर लावला होता. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याने गेले वर्षभर घरातच उपचार सुरू होते. थकित वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या व कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांमधून होत आहे. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय आवारात भरपावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.