दहावीच्या निकालात मुलींची बाजी ; राज्याचा एकूण निकाल ९६.९४ टक्के
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६ आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी
पुणे: ९६.१६
नागपूर: ९७.००
औरंगाबाद: ९६.३३
मुंबई: ९६.९४
कोल्हापूर: ९८.५०
अमरावती: ९६.८१
नाशिक: ९५.९०
लातूर: ९७.२७
कोकण: ९९.२७
निकाल कुठे पाहाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://ssc.mahresults.org.in
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै
प्रथम श्रेणीसह ६,५०,७७९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. २४ विषयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२,२१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला.