महाराष्ट्र

खरवड येथे जिओ टॉवर धूळखात ; नेटवर्क नसल्याने नागरिक हैराण

बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील खरवड येथे जिओ या खासगी कंपनीचे टॉवर उभे करण्याचे काम दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून नुसता मनोरा उभा केला गेला असून तो आता धूळखात पडला आहे. जिओ या खासगी कंपनीचे ग्राहक परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र नेटवर्क नसल्याने नागरिकांना महत्वाच्या संभाषणासाठी अडचणी निर्माण होत असून संभाषण तसेच नेट वापरण्यासाठी गावाच्या बाहेर जावे लागत असल्याचे चित्र आहे.

टॉवर उभे करून अनेक दिवस झाले असून याकडे संबधित कंपनीचे कोणतेही अधिकारी फिरकलेच नाही. त्यामुळे नुसता मनोरा उभा करूनच मोकळे सोडले आहे. तरी हे टॉवर कधी सुरू होणार नेमक घोड कुठ अडल आहे? असा सवाल ग्रामस्थांनकडून उपस्थित केला जात आहे. हे टॉवर सुरू झाल्याने नेटवर्कची समस्या सुटणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे.

सध्याच्या आधुनिक युगात मोबाईल फोन ही मानवाची चौथी गरज असून बहुतांशी काम ही ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईल द्वारे अनेक काम घरबसल्या करता येत असतात. जिओ ने रिचार्ज दर वाढवले असून तरीही मात्र ग्राहक त्याला पसंती देत आहेत. तरी संबंधित कंपनी ने याकडे लक्ष देवून हे टॉवर सुरू केले पाहिजे अशी अपेक्षा आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे