जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending

गिरणा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा.

जळगांव:१४ जुलै २०२२ (प्रतिनिधि)

आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी गिरणा धरणात दुपार पर्यंत ८०% टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरणा नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरिल नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही. याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०,००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १,००,००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो, तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन शाखा अभियंता सिंचन पाटशाखा नागदुली ता.एंरडोल व गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव व जिल्हा प्रशासन जळगावच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे