महाराष्ट्र

शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य इतिहासाला धरुन नाही ; संभाजीराजेंची राज ठाकरेंवर टीका

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबात केलेले व्यक्तव्य इतिहासाला धरुन नाहीये असं म्हणत खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं, कुणीही असेल… प्रामुख्याने जे जबाबदार व्यक्ती असतात. इतिहास जेव्हा आपण मांडतो तेव्हा इतिहासाला धरुन बोलायचं असंतं. जे काही वाक्य… समाधी ज्यांनी कुणी बांधलं असं बोललं गेलं ते साफ चुकीचं आहे. हे इतिहासाला धरुन नाहीये हे स्पष्टपणे मी सांगतो. त्यात खोल जाण्यापेक्षा त्यांनी त्याचा अभ्यास करावा. समाधी ज्या जबाबदार व्यक्तीने सांगितलं की, या व्यक्तीने बांधलं ते साफ चुकीचं आहे.

त्यांनी असं का म्हटलं याबाबत मला भाष्य करायचं नाहीये. मला असं वाटतं की, इतिहास जेव्हा आपण मांडतो.. जर आपल्याला पूर्णपणे माहिती असेल तरच त्याच्यावर बोलावं नाहीतर त्याला हात सुद्धा लावू नये. मला इतकंच सांगायचं आहे की, ही समाधी टिळकांच्या हातून बांधली गेलेली नाहीये. मला जर इतिहास विचारला तर छत्रपतींचा वंशज म्हणून अधिकृतपणे, विचार करुन सांगू शकतो की ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाहीये असं विधान छत्रपती संभाजीराजे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, राज ठाकरेंच्या या विधानावर संभाजीराज यांनी म्हटलं, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या व्यतिरिक्त इतरही मुद्दे आहेत असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे