युवारंगचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि पूज्य साने गुरुजी, विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ चा उद्घाटन सोहळा दि. २० एप्रिल रोजी जल्लोषात पार पडला.
प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, व पूज्य साने गुरुजी, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, यांच्या हस्ते युवारंग महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर युवारंगाचे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, यांच्या हस्ते युवारंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कांतीलाल टाटिया, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, संस्थेचे मानद सचिव कमलताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई दीपक पाटील, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. किशोर पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.सुनिल कुलकर्णी, युवारंगचे समन्वयक प्रा.डॉ. आय.जे.पाटील, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले की, आपल्यात जे कलागुण आहेत त्या कलागुणांना सादर करण्यासाठी हे कलामंच आम्ही आपणास उपलब्ध केले आहे. विद्यापीठाचे काम आहे संसारक्षण रोजगारक्षण यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. या वर्षांपासून आम्ही लोककलामहोत्सवाचे देखील आयोजन करणार आहोत. आमच्या विद्यापीठाची परंपरा आहे ती आम्ही यावर्षी आनंदमय वातावरणात सादर आहोत.
पुन्हा एकदा युवारंग महोत्सव
राष्ट्रीय सेवा योजना एककाचा उपक्रमाच्या माध्यमाने स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महिला सशक्तीकरण, माझी वसुंधरा अभियान, बेटी बचाओ -बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रदूषण, निसर्ग संरक्षण, रक्तदान, सोशल मीडिया, रस्ता सुरक्षा, वेगवेगळ्या विषयांवर पोस्टर्स, रांगोळ्या काढून तसेच परिसरात ठिकठिकाणी फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांच्या कालखंडानंतर महाविद्यालयीन तरुणाई युवारंग निमित्ताने एकत्रित आले असून त्यांच्यात अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
पहिल्या दिवशी झालेले कार्यक्रम
रंगमंच क्र. १ खुले मंच स्वातंत्र्य सेनानी आण्णासाहेब पी.के. पाटील रंगमंच येथे उद्घाटनानंतर सकाळी ९ वाजता मिमिक्री सादर करण्यात आली व ४ वाजता विंडंबननाट्य सादर करण्यात आले. रंगमंच क्र. २ बाल हुतात्मा शिरीषकुमार रंगमंच महात्मा गांधी सभागृहामध्ये भारतीय लोकगीत सादर करण्यात आलेत. रंगमंच क्र. ३ हुतात्मा लालदास शहा रंगमंच, गुरुवर्य सी. डी. शहा सभागृह येथे काव्यवाचन सादर करण्यात आले. रंगमंच क्र. ४ वीर भगतसिंग रंगमंच, सर विश्वेश्वरय्या सभागृह येथे शास्त्रीय वादन ( सुरवाध्य), शास्त्रीय वादन ( तालवाध्य) सादर करण्यात आले. आणि रंगमंच क्र. ५ वीर बिरसामुंडा रंगमंच येथे रांगोळी व व्यंगचित्र सादर करण्यात आले.
प्रतिक्रिया
१) आरती राजेंद्र मांडगे (चाळीसगाव महाविद्यालय)
युवारंग २०२१ चे आयोजन व नियोजन उत्कृष्ट असे आहे. युवारंग मध्ये खुप काही शिकण्यासाठी मिळते. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकण्यास या मंचावर पहावयास मिळत आहेत.
२) दीप्ती पाटील, (जळगाव)
युवारंग मध्ये माझा पहिला अनुभव होता होता.या महाविद्यालयाचे खूप छान नियोजन आहे. प्रत्येक स्पर्धेतुन काहींना काही शिकण्यास मिळते. आणि अश्या युवारंग मध्ये मला वारंवार सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.
१९ रोजी संध्याकाळपर्यंत १०७ महाविद्यालयांनी नोंदणी
विद्यार्थी ५०२
विद्यार्थिनी ५८६
व्यावसायिक कलाकार ९५
सहायक विद्यार्थी कलाकार ७५
पुरुष संघव्यवस्थापक १०६
महिला संघव्यवस्थापक १०६
एकूण सहभाग १४७०



