महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा ; जयश्री चव्हाण प्रथम तर रुपाली माळी द्वितीय

पहूर, ता. जामनेर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबई फुले माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत जयश्री चव्हाण हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. रूपाली माळी हिने द्वितीय, निखिल पांडव याने याने तृतीय तर अनिकेत जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्यांना शंकर भामेरे लिखीत ‘समतेचे शिलेदार’ पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या अध्यक्षतेखाली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी जाहीर करून विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे