शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन परत जोडून द्यावे ; आ. रमेशआप्पा थोरात यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची घेतली भेट
दौंड (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज तोडणी महावितरण कडून सुरू आहे. त्या संदर्भात दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या संदर्भात आज आमदार रमेशआप्पा थोरात यांनी केडगाव येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या वीज तोडण्या ताबडतोब थांबवून तोडलेले कनेक्शन परत जोडून द्यावेत अशी मागणी केली.
गेल्या दोन वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आमचा शेतकरी अत्ता कुठे तग धरू लागला आहे. त्यात त्यांची वीज कापणे हे शेतकऱ्यांचा उद्रेक घडवणारी कृती आहे. त्यामुळे महावितरण ने वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मुदतवाढ देणे आवश्यक आहे असे लेखी निवेदन आज महावितरणला दिले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पुणे जिल्हा समाजकल्याण सभापती सारीकाताई पानसरे, महिला सरचिटणीस वैशालीताई नागवडे, मा.सभापती मीनाताई धायगुडे, पं. स.सदस्या आशाताई शितोळे, नितीन दोरगे, सरपंच अवंतिकाताई शितोळे, शिवाजी ढमाले आदी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.