महाराष्ट्र

भावी नगराध्यक्ष म्हणत नगरपालीकेचे सुत्रे हाती घेण्याचे जनआर्शिवाद देत लोकांनी साजरा केला आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस

दोंडाईचा (प्रतिनिधी) घराणेशाही-राजेशाही अशी काही पुर्वजांनी दिलेली देणगी नसताना. बादशहा, राजा, हुकूमचा एक्का हे सर्व कोणा एका माणसाच्या नशीबात येऊ शकत नाही. पण ते म्हणतात ना, दैवशक्ती ज्याच्यावर मेहरबान-प्रसन्न असते.तेव्हा अशा व्यक्तीकडे ना राज, ना पाट जरी असले नाही. तरी देव अशा व्यक्तीला डोक्यात-खिशात सरस्वती-लक्ष्मीसह कोणत्याही गोष्टींची कमी पडू न देता. रोज उठून त्याच्या हातुन दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या गरजा ओळखत, त्यांच्या अडीअडचणी सोडत बादशहा व राजा बनवून टाकते व कालातरांने हाच व्यक्ती आपल्या सार्वजनिक जिवन जगताना हुकूमचा एक्का स्थान मिळवत. जिथे उभे राहील-जिथे जाईल. तिथे आपली छाप पाडत-किमंत वाढवत.

लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळे कधी कधी आपली साधी राहणीमान व आपला साधा-भोळा स्वभाव हे जरी आपल्या चारित्र्याचे खरे दागिने असले तरी, आपली वाढती लोकप्रियता-लोकांचा गोतावळा काही जवळून वाढवलेल्या लोकांना व विरोधकांना पचत नाही. तेव्हा हे सामान्य परिस्थितीतून स्वतः वाढवलेले फुटीरवादी लोक व पाचवीला पुजलेले विरोधक क्षणात अशा व्यक्तीची उंची गाठायचा प्रयत्न करत. समोरची व्यक्ती कशी कमी व आम्ही कसे निपुण-गुणवान म्हणत. जनतेमध्ये छाप पाडायचा प्रयत्न करतात. पण ते म्हणतात दैव-शक्ती ज्याच्यावर मेहरबान-प्रसन्न असते. त्याचे हजार दुश्मन जरी निर्माण झाले व नको त्या बाजूने त्रास द्यायचा प्रयत्न केला. तरी त्याचा बाल ही वाकडा करू शकत नाही व शेवटी खरे सोने हे खरे असते व जे पितळ असते ते एक ना एक दिवस जनतेसमोर उघडे पडत असते व असाच काही अडचणी-त्रास विरोधकांसह स्वकियांनीही ज्यांना देयाचा प्रयत्न केला.

तरी कोणत्याही अडचणी-परिस्थितीतून गनिमी काव्यांतुन मार्ग काढत. सदैव आपल्यापर्यंत आलेल्या जनतेच्या गरजा-समस्या सोडवत.ना-राज,ना पाट असताना फक्त दैव-शक्तीच्या बलभुत्यावर बादशहा-राजेशाही सारखे जीवन जगत. लोकांनी ज्यांना आज भावी नगराध्यक्ष म्हणत नगरपालीकेचे सुत्रे हाती घेण्याचे जनआर्शिवाद दिले व चौकाचौकात केक कापत वाढदिवस साजरा करत, आपल्या लाडक्या नेत्याचा मस्तकावर टिळा लावत. सामाजिक व राजकीय जीवनात यशस्वी होण्याचे आर्शिवाद दिले, असे लोकप्रिय नेते डॉ. बापुसाहेब रविंद्रजी देशमुख यांचा वाढदिवस सर्वसामान्य लोकांनी मोठ्या दिमाखात गावात-चौकाचौकात साजरा करण्यात आला आहे.

तरी डॉ. बापूसाहेब ह्यांनी आपला व लोकांचा मागील अडीअडचणींचा काळ पाहत, कोरोना सारख्या परिस्थितीतून बाहेर पडलेल्या लोकांना आपल्या वाढदिवसाठी लवाजमा खर्च न करता. फक्त भेटीगाठीचे नियोजन केले होते. मात्र सर्वसामान्य लोकांचे हे प्रेम आहे की,ज्यांनी आपल्या नेत्याचा चेहऱ्यावर आनंद-हसु आणण्यासाठी हा सर्व खटाटोप केला. म्हणून डॉ. बापूसाहेब मागील काळात आपल्यावर विरोधक व स्वकियांनी दिलेल्या त्रासाकडे पाहत व जे लोक आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण पाहू इच्छित आहे. त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या समारोप संध्याकाळी आपल्या जिवनातील घडामोडी संदर्भात जुडणाऱ्या चित्रपटातील चार ओळी सांगितल्या, त्या अशा- जिने के लिए सोचा ही नही! दर्द संभालने होंगे! मुस्कुराये तो, मुस्कूराने के कर्जे चुकाने होंगे! असे म्हणत. चेहऱ्यावर आनंद ठेवत. दिवसभरातील वाढदिवसाच्या कार्यक्रमांची समाप्ती केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे