महाराष्ट्र

१६५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आप्पासाहेब यांनी घेतली भेट

वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूर तहसिल कार्यालय समोर चालू असलेले शेतकरी आंदोलनाचे 165 दिवस झाले असून या आंदोलनाला लक्ष देण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी वैजापूर तालुक्यातील लाडके माजी खासदार स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली व चालू असलेले आंदोलनाचे आढावा बैठक घेऊन हे एक प्रकारचा शेतकऱ्यांवर अन्याय, शेतकऱ्यांचे हक्काची मागणीसाठी 165 दिवस आंदोलन करणं हे शोभत नाही, शासन व प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष द्यायचे असते व त्या पिक विमा कंपनी विरोधात विभागामार्फत गुन्हा नोंद करायचे असते, परंतु 165 दिवसाची आंदोलनाला सर्वांनी पाठ फिरवली, सर्वांनी पाठ फिरवली असे नाकारता येत नाही करीत आम्ही जिल्हाधिकारी समोर हे प्रश्न मांडून होत असलेली लूटमार थांबविल्या शिवाय राहणार नाही, असं आप्पासाहेब म्हणाले.

शासन व प्रशासनाने या शेतकरी आंदोलनाकडे लक्ष देऊन ताबडतोब शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, राज्य सरकारने सन 2020 व 21 वल्ला दुष्काळ जाहीर केला होता. म्हणून नुकसान पोटी राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना अनुदान दिले. मग या पीक विमा कंपनी पिक विमाची प्रिया घेऊन झालेले खरीप पिक विमाचे नुकसान फुटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. जर पिक विमा कंपनी वेळेवर निर्णय घेत नसेल तर मी व माझे सहकारी या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रोडवर उठल्याशिवाय राहणार नाही तरी तरी शासन व प्रशासनाने या बोगस पीक विमा कंपनीला वेळेत मुस्का वळून शेतकऱ्यांचे घेतलेले पैसे परत या माध्यमातून नुकसान पोटी ताबडतोब शेतकऱ्यांना द्यावा आम्ही सर्व शेतकरी आहे. आम्हाला सर्व शेतकऱ्यांची कळकळ समजते ज्या शेतकरी आपले हक्कासाठी वैजापूर तहसिल कार्यालय समोर गेल्याचे 65 दिवसापासून आंदोलन करतो हे निंदनीय बाब आहे मला असे वाटते शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिलेला नाही तालुक्यात या शेतकरीचे आवाज उठवण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आंदोलनाची जबाबदारी राहील तरी मी आज जाहीर करतो की हे शेतकरी आंदोलन मी स्वतः रस्त्यावर उतरून हक्काची मागणी करेल असे आश्वासन देऊन आप्पासाहेब पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना हिम्मत दिली.

या आंदोलनामध्ये रियाज खान पठाण, लक्ष्मीबाई आव्हाळे, रंगनाथ पेरकर, निवृत्ती सोनवणे, भगवान देशमुख, दत्तात्रय पाटील, भानुदास पाटील, कहाणे संजय उगले, शेख शकील, विक्रम पठाण, शेख मोसम, अवधूत नंदगिरी महाराज, माजी सरपंच अरविंद शेवाळे, बाबुराव जगताप, स्वतंत्र सेनानी, चांगदेव उघडे, अरुण गायकवाड व तमाम शेतकरी उपोषणकर्ते यांनी भेट देऊन आंदोलनाला बळ दिला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे