ब्रेकिंग
Trending

स्टेट बँकेचा मॅनेजर व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार गरीब जनता त्रस्त

यावल प्रतिनिधी (अलाउद्दीन तडवी):- सविस्तर वृत्त असे की सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार यावल येथील एसबीआय शाखेत खाते असलेल्या वयोवृद्ध,अपंग,विधवा आणि इतर खातेधारकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास. शाखेत ग्राहक गेले असता त्यांना नीट उत्तर मिळत नसून उडवा उडवी ची उत्तरे स्टेट बँक कर्मचाऱ्यांकडून मिळतात. जर एखादा खातेदार कंटाळून बँक मॅनेजर पर्यंत पोहचलाच तर बँकेचे मॅनेजर “विजय टाले” हे ग्राहकाला बोलतात की “तुम्ही बँकेत गोंधळ घालत आहेत पोलिसात जमा करतो तुम्हाला” अशा प्रकारचे उत्तर गोरगरीब जनतेला मिळत असल्याचे खातेदार ग्राहकांकडून कळते .


एखादा खातेदार सकाळी आठ वाजेपासून बँकेच्या बाहेर नंबर लावून उभा असतो आणि जेव्हा बँक उघडते तेव्हा तो आपले नंबरखिडकीजवळ लावतो त्यावेळेस त्याच्यासोबत घडते की जर खाते धारकाला 2000,3000,5000 रुपये विड्रॉल करायचे असतील किंवा डिपॉझिट करायचे असतील तर ते विड्रॉल करून दिले जात नाहीत. तर त्या खातेधारकाला उत्तर मिळते की तुम्ही ही रक्कम बाहेरून काढा मिनी बँकेतून ही रक्कम भेटेल येथे आम्ही देऊ शकत नाही. मॅनेजरच्या आदेश आहेत. वयोवृद्ध व्यक्ति न देखील अशाच प्रकारची वागणूक बँक देत आहे.बँक मॅनेजर विजय टाले आणि कर्मचारी हे बँकेत मनमानी करभार करीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन ह्याकडे लक्ष देईल असा हि सवाल उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे