महाराष्ट्रराजकीय

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने निराधार योजनेची बैठक संपन्न

तालुक्यातील ५८९ पात्र निराधारांच्या संचिका मंजूर

सिल्लोड (विवेक महाजन) महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड येथे तहसिल कार्यालयात निराधार योजनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेसाठी २४० तर श्रावण बाळ योजनेसाठी ३४९ असे एकूण ५८९ पात्र संचिकांना मंजुरी देण्यात देण्यात आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने निराधार योजनेची बैठक नियमितपणे होत असल्याने निराधारांना मोठा आधार मिळत आहे.

तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.2) रोजी शासकीय कमिटीच्या झालेल्या बैठकीत ऑनलाइन झालेल्या सर्व पात्र संचिका निकाली काढण्यात आल्या. यात एकून ४१९ संचिकांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने त्रुटी आढळून आलेल्या नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येणार असून संचिकेत त्रुटी असलेल्या नागरिकांनी त्रुटींची पूर्तता करावी जेणे करून येत्या बैठकीत पात्र संचिकाना मंजुरी देता येईल असे तहसीलदार विक्रम राजपूत म्हणाले.

पात्र संचिका मंजूर करण्यात आलेल्या लाभार्त्यांना शासनाच्या नियमानुसार आता दर महिन्याला 1 हजार रुपये मानधन मिळणार आहे. ज्यांच्या संचिका आवश्यक कागदपत्रे अभावी नामंजूर झाल्या आहेत त्यांनी सदरील पूर्तता करून द्यावी. यातील पात्र संचिका त्वरित निकाली काढण्यात येईल. निराधार योजनेसंबंधी लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याने निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे