महाराष्ट्र

बिलोली शहरातील भौतिक सुविधा उपलब्ध करुन द्या ; ऑल इंडिया तंजिम ए इंसाफची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) बिलोली शहरातील अनेक भौतिक सुविधा अभावी नागरिकांना नाहक्क त्रास सहन करावा लागत आहे. अशा विविध मागणीचे निवेदन ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ या सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा न.प प्रशासक सचिन गीरी यांच्याकडे करण्यात आली.

मागण्या खालीलप्रमाणे 

जुना बसस्थानक येथे प्रवाशांसाठी बसण्यासाठी शेड (बस्थानक) उभारण्यात यावे, शहरातील बोधन मार्गावरील नाली व डिव्हायडरचे कामे राहिले आहेत ते त्वरीत पुर्ण करण्यात यावेत, राज्य महामार्गावरील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावेत. (न.प. समोर, बस स्थानासमोर व देशमुख नगर समोरील),शहरातील नवीन बस स्थानक व जुना बस स्थानक येथे सार्वजनिक मुतारीची व्यवस्था करण्यात यावी, देशमुख नगर येथील नालीवरील तुटले स्लॅप तात्काळ नवीन टाकण्यात यावेत,तुकाराम नगर व प्रशांत नगर येथे राहिलेले रोड व नालीचे कामे तात्काळ करण्यात यावे ,जुनी नगर परिषदेच्या जागेवर फळ व भाजीपाला व्यापाऱ्यांसाठी जागा खुली करण्यात यावी, आदी मागणी करण्यात आल्या. तसेच वरील मागण्याच्या संदर्भात तात्काळ कोणतीच कार्यवाही नाही झाल्यास दिनांक 14/3/2022 रोजी अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशाराही देण्यात आले. निवेदनावर अॉल इंडिया तंजिम ए इंसाफचे बिलोली तालुकाध्यक्ष ए.जी कुरेशी, सचिव सय्यद रियाज, उपाध्यक्ष रफीयोद्दीन इनामदार, सदस्य मोहसिन खॉन आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे