महाराष्ट्र

कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व पर्यटकांना : गणेश चप्पलवार

देगलूर (प्रतिनिधी) कृषी पर्यटन हा महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. कृषी पर्यटनाच्य मध्यामातून शेतीला पैसा व प्रतिष्ठा मिळतं आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाची कास धरली आहेत. अनेक तरुण व शेतकरी यशस्वीरीत्या कृषी व ग्रामीण पर्यटन चालवत आहेत. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपले शेती मालाची विक्री करू शकतो.

कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व शहरी . याचा विचार करून शेतकऱ्याने कृषी पर्यटनाकडे वळण्याचे मार्गदर्शन गणेश चप्पलवार यांनी केले ते वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आलेल्या विशेष युवक शिबीराप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की,कृषी पर्यटनचे भविष्य उज्ज्वल आहे.अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच विद्यार्थी शिक्षणासह व्यवसायात नवनवीन माहिती घ्यावी. शेतीमध्ये नवीन प्रयोग केले पाहिजे. शेती टिकली पाहिजे. शेती विकली तर आपण गुलाम व मजूर व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भास्कर कोशिडगेवार, प्रमुख पाहुणे म्हणून काठेवाडीचे सरपंच सूर्यकांत पोतुलवार, प्रमुख वक्ते म्हणून गणेश चप्पलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सतीश जांभाळीकर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे