महाराष्ट्रराजकीय

सावखेड गंगा येथील नागरिकांचा सतरा वर्षाचा पाण्याचा वनवास संपला.

दिनांक: ४ आँगस्ट २०२२

वैजापुर प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ

वैजापूर तालुक्यातील सावखेड गंगा येथील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच सदस्य व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाच्या विकास कामाला गती मिळाली आहे. सतरा वर्षापासून पाण्यापासून वंचित असलेले गावापासून एक किलोमीटर शेत वस्तीवर राहत असलेले गोविंद थिटे यांनी संवाद साधत असतांना बोलले की खरा अर्थाने आज आमचा १७ वर्षाचा वनवास संपला.

या अगोदर ही गोष्ट झाली पाहिजे होती ती आज सरपंच,उपसरपंच व गावकऱ्यांच्या सहकार्याने उदयास आली, तसेच संपूर्ण गावांमध्ये नळ योजना व गावापासून एक किलोमीटर असलेल्या शेत वस्ती वरती नळ योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आली.

गावातील सार्वजनिक जागेवरती जसे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी समाज मंदिर या ठिकाणी ग्रामपंचायत च्या वतीने पेेव्हर ब्लॉक बसवण्यात आले व अंगणवाडीतील छोट्या छोट्या मुलांसाठी खेळणी साहित्य खरेदी केली एकंदरीत गावातील प्रत्येक समस्या कडे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तसेच गावकऱ्यांचे लक्ष असते म्हणून या सावखेड गंगा गावाचा विकास होत आहे व शासनाचा आलेला निधी विकास कामासाठी वापरला जातो हे सर्व शक्य करण्यासाठी गावकऱ्यांचे मोठे सहकार्य आहे असे गोविंद थेटे बोललेत हे बोलत असताना गावातील नागरिक विजय नरोडे कैलास नरोडे अशोक मोटे रंगनाथ गागरे यांनीही मानलेत ग्रामपंचायतचे आभार व गावाचा अजून विकास होऊ यासाठी आम्ही संपूर्ण गावकरी ग्रामपंचायतला आमच्या वतीने मदत करत राहू.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे