महाराष्ट्र

राज्यसभा निवडणुकीत गाफील राहिल्याने पराभव झाला ; एकनाथ खडसे यांचे मत

अंबरनाथ : राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. त्यामुळे आता विधान परिषदेला ताकही फुंकून प्यावे लागेल असे परखड मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथ येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरेच काही शिकलो. जो अतिआत्मविश्वास होता त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. त्याकडे आता दुर्लक्ष होता कामा नये, ही शिकवण यावेळी मिळाल्याचे खडसे यांनी कबूल केले. मात्र पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा असला तरी तो महाविकास आघाडीचा पराभव आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येत्या विधान परिषद निवडणुकीत यापासून धडा घेत ताकही फुंकून पिण्याची गरज असून त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे