वार गावात केंद्रीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे जनजागृती रॅली
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील वार गावात विज्ञान दिवसाचे औचित्य साधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुळे पर्यावरनाला कशा पद्धतीने हानी पोहोचत आहे यासाठी प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती रॅली काढून नागरिकांना प्लास्टिक मुळे पर्यावरणाची कशापद्धतीने हानी होत आहे याची माहिती या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे. त्याचबरोबर या प्लास्टिकचा उपयोग हे विद्यार्थी मेडिटेशन रूम बनवणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
धुळे तालुक्यातील वार या गावातील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेच्या या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम सोमवारी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत राबविला आहे.