वैजापूर तहसीलदारांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्षांना दिली धमकी
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड यांनी फोन द्वारे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रियाज पठाण यांना धमकी दिली आहे.
सन 2020 व 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे 90% नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत पिक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना अदा करणे जरुरीचे होते। परंतू “शेतकन्यांचे नुकसान होऊन देखील पिक विम्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. करीता अतिवृष्टीमूळे खरीप हंगामाचे 90% नुकसान झाल्यामूळे सरसकट पिक विमा मिळावे अशी मागणी करणारे विनंती अर्ज शेतकऱ्यांनी केले. परंतू शेतकऱ्यांची सदर मागणी बददल विचार करण्यात आले नाही.
करीता शेवटी नाविलाज़ाने या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. म्हणून या शेतकऱ्यांनी वैजापूर तहसील कार्यालया समोर पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी चक्री उपोषण द्वारे आंदोलन दिनांक 27/09/2021 पासून चालु होते. सदर चक्री आंदोलनाला आता 236 दिवस उलटूनही सदर शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही, म्हणून आजपर्यन्त वैजापूर तहसील कार्यालयासमोर प्रस्तुतचे आंदोलन चालू आहे.
आज दि.01/06/2022 रोजी सकाळी 9:05 वाजता तहसीलदार यांनी फोन नं. 9421312299 या नंबरवरुन आम्हाला धमकी दिली की, तूम्हाला पिक विमा मिळणार नाही, तुमचा आंदालन मोडीत काढा, तूमचे बॅनर काढून टाका अशी धमकी दिली. नंदोलनाच्या ठिकाणी पेंडाल मध्ये इसम माणिकराव जाधव हा आला व त्याने आंदोलन कर्त्यांचे बॅन सदर फोन झाल्यानंतर “फाडून टाकले, पोष्टर काढले, कागदपत्राची नासधूस करून फेकून दिले, फोटो फाडले, व म्हणाव की, “तहसीलदार यांनी सांगितले की, आंदोलन बंद करा, नाहीतर तूमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली.



