महाराष्ट्र

अंबड येथील शेतकऱ्यांचे अंबड महावितरणासमोर धरणे आंदोलन

शहापुर (देविदास भोईर) हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांनी अंबड येथील उपविभागीय कार्यालयात ठिय्या करत आंदोलन केले. जोपर्यंत शेतीपापंचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरून उठणार नाही असे शेतकऱ्यांनी हट्ट धारल्यानंतर संबधित कनिष्ठ अभियंता धारकोंडे यांनी आज संध्याकाळपासून वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना वेळेत विजपुरवठा देण्यात येईल असे यावेळी त्यांनी ठोस आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित चेअरमन दिनेशराव वाघ, प.स.सदस्य कैलास वाघ, उपसरपंच सोनाजी गाढे,माजी सरपंच नारायणराव सावंत, आसाराम भाऊ दौड, प्रकाश वायभट, पांडुरंग शिंदे, ग्रा.प.सदस्य तुकाराम चेपटे, आ.नारायण कुचे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घुगे, विष्णु वाघ, भास्कर वाघ, सुधाकर वाघ, मनोहर घुगे, गणपत घुगे, संदीप आव्हाड, संदीप वाघ, नितीन वाघ, विठ्ठल सोनवणे, यदुराव अनपत, मारोती सावत, गणपत घुगे, गणेश घुगे, महादेव घुगे, बाबासाहेब वाघ, कारभारी अप्पा बोगाने, पिंटू रसाळ, राहुल दौड, व उपस्थित सर्व हस्तपोखरी येथील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे