महाराष्ट्र

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर (धरणेंद्र मंडपे) दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये बंधारे पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून वास्तव्य करणे देखील कामगारांना शक्य होत नाही. खोपटामध्ये पाणी शिरले आहे तर ऊसाच्या सऱ्यांमध्येही पाणी साचले असल्याने तोडणी शक्य नाही. ऊसतोडणीला जाणारे मजूर आता राहण्याची व्यवस्था करण्यातच दंग आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उसाच्या शेतामधील सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने ऊस तोडणी खोळंबली आहे. अर्धवट तोडणी झालेला ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागतेय.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे