गुन्हेगारीमहाराष्ट्र

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात ; महिला आणि पुरुष दोघांचा मृत्यू

शिरपूर (ॠषिकेश शिंपी) मोटरसायकलीने जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव कारने धडक दिल्याने मोटरसायकल वरील महिला व पुरुष दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि. १० रोजी अमळनेर तालुक्यातील नगाव गडखांब येथील पंढरीनाथ गणपत वारुळे (वय ५५) हे मोटारसायकलीने आशाबाई शालिग्राम मराठे यांना घेऊन नरडाणा रेल्वेस्टेशनवरुन शिरपूरच्या दिशेने जात असतांना शिरपूरहुन धुळ्याकडे भरधाव जाणारी एम. एच. 02 सीएल 8496 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने मोटरसायकलीला जोराने धडक दिली. यात पंढरीनाथ वारुळे यांचा जागिच मृत्यू झाला तर आशाबाई मराठे या दुरवर फेकल्या गेल्या. त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र यावेळी आशाबाई मराठे यांचा ही मृत्यू झाला. याबाबत नरडाणा पोलीस स्टेशनात कारचालक मयूर रवींद्र चौधरी (रा.धुळे) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे