कोरोना रुग्णसंख्या वाढत गेल्यास राज्यात पुन्हा लॉकडाउन करावा लागेल : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (प्रतिनिधी) मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी कोरोना रूणांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, निर्बंध लादून पुन्हा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. येथे राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नुतनीकरणाची पहाणी आणि उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. राज्यातही कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.