ब्रेकिंग
Trending

शांततेत गणपती विसर्जन खांद्यावर उचलून नागरिकांनी पोलिसांचे केलेत आभार व्यक्त

अखिलेशकुमार धिमान

भुुुसावळ : गणपती विसर्जनासाठी श्रींची ३५ मंडळाची मिरवणुक शासनाने ठरवलेली वेळेप्रमाणे व संवेदनशील भागातून‌ अगदी शांतपणे पार पडल्याचे जोश पोलिसांना ही रोखता आले नाही. सविस्तर वृत्त असे कि, कोरोना काळाचे दोन वर्षानंतर यंदा गणपती उत्सव साजरा करण्यात आला. व या साठी भुसावळात एकुण ३५ मंडळांनी “श्रीं” ची स्थापना करुन १० दिवसासंतर काल दि.९ रोजी बप्पांना जल्लोषात निरोप दिला. संपूर्ण शहरातील मिरवणुक ही मुख्यबाजारपेठेतून तापी व वाघूर नदी काठी विसर्जनासाठी पोहोचली.
भुुुसावळ शहराला लाभलेले कर्मठ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरात अप्रिय घटना घडू नये या साठी जळगांव चे जिल्हापोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे व
अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचा मार्गदर्शनाखाली नगरपालिका चे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचासह योजनेबद्ध नियोजन करुन सर्व मिरवणूक शांततेत पार पाडली. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी स्वत:‌भुुुसावळ शहरात तळ ठोकुन होते. शेवटी सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्याचे आनंद पोलिसांनी ही व्यक्त केले शेवटची श्री साई मंडळाची मिरवणूकात मंडळाचे व सार्वजनिक गणेशोस्तव समीतीचे पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यांनी अप्पर‌पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे,नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार सह सर्व‌ पोलीस व प्रशासनाचे कर्मचारांनी सुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे