महाराष्ट्र

शिंदखेडा येथील वटपौर्णिमेला महिलांनी वडाची लागवड करून केले पूजन

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील साईनगर येथे राहणाऱ्या महिलांनी वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वडाची लागवड करून विधिवत पुजन केले.

वटसावित्री पौर्णिमेला महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभून सात जन्म हा पती म्हणून मिळाला. यासाठी वडाची पूजा करून हे व्रत करतात. काही वर्षां पासून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचे समतोल बिघडले आहे. तापमानात झालेली वाढ, अति वृष्टी या सारख्या नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. या संकटापासून वाचण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व जाणून साई नगर येथील राहणाऱ्या रत्नाबाई देविदास चौधरी, सारिका विनोद चौधरी, रुपाली योगेश चौधरी, करिष्मा सुशील चौधरी, नीता डिगंबर पाटील या महिलांनी वडाची लागवड करून विधिवत पुजन केले. दरवर्षी वटसावित्री पोर्णिमेला वडाची लागवड करण्यात येते. याप्रसंगी रुपाली चौधरी यांनी वटपोर्णिमेला महिलांना कमीत कमी एक वडाची लागवड करून संगोपन करावे असे आवाहन महिलांना केले. वृक्ष लागवडीसाठी महिलांना वडाचे रोप वृक्ष संवर्धन समिती शिंदखेडा च्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे