चोपडा

कंगना रानौत यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : चोपडा काँग्रेसची मागणी

चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाढे , तालुका विशेष प्रतिनिधी

चोपडा : कंगना रानौत यांनी 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. असे विधान करून स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. रनौत यांनी देशद्रोह केला आहे .म्हणून त्यांचेवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली., तसेच कंगना रानौत यांना भारत सरकार तर्फे देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार महामहीम राष्ट्रपती यांनी परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील यांचे मार्गदर्शनानुसार चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एन एस यु आय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोपडा तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरची मागणी केली. चोपडा तहसीलदार यांचे वतीने नायब तहसीलदार सय्यद यांनी निवेदन स्वीकारले. सदरची मागणी वरिष्ठांकडे पाठवीत असल्याचे नायब तहसिलदार सय्यद यांनी सांगितले. निवेदन देतांना चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, रमाकांत सोनवणे, देवकांत चौधरी, इलियास पटेल, रोहन सोनवणे, हर्षवर्धन पवार, संदीप बोरसे ,अभिजीत देशमुख, धनंजय पाटील ,भोईटे सर आदी उपस्थित होते. कंगना राणावत यांच्यावर लवकर कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे