शिंदखेडा येथे खरीप हंगाम पुर्व शेतकरी मेळावा व शेतकरी शास्रज्ञ परिसंवाद
शास्त्रोक्त पद्धतीने शेती करावी असे आमदार जयकुमार रावल यांचे प्रतिपादन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील काकाजी मंगल कार्यालयात आयोजित शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पुर्व शेतकरी मेळावा व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
ह्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कामराज निकम, पंचायत समिती सभापती अनिता राकेश पाटील, उपसभापती राजेश पाटील, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपानगरध्यक्ष प्रकाश देसले, जि.प.सदस्य धनंजय मंगळे, डी.आर.पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, पंकज कदम, कृषी उप विभागीय अधिकारी एस.डी.मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, पंचायत समिती सदस्य रणजितसिंह गिरासे, नारायण सिंग गिरासे, डॉ.दिपक बोरसे, छायाताई रणजित गिरासे, दिपक मोरे, अरुण सोनवणे, जिजाबराव सोनवणे, साहेबराव पेंढारकर, सुभाष माळी, प्रकाश चौधरी , सुरज देसले, डी.एस.गिरासे यासह पदाधिकारी व अधिकारी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषी सहायक उमाकांत सावंत, बी.डी.जळे, काथापुरे, एस.डी.मालपुरे यांनी शास्त्रज्ञ परिसंवादात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी तालुका आढावा सादर केला.
सुत्रसंचलन मुकेश सोनवणे यांनी केले तर ह्यावेळी अध्यक्षिय भाषणातून आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करावी असे आवाहन करून शिंदखेडा तालुका हा पुर्वी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र मागील काळात तापी नदीवरील बॅरेजेस, सिंचन विहीरी, जलयुक्त शिवार योजना, बुराई नदी पात्रात बारमाही बांधलेल्या बंधारा मुळे सिंचन क्षेत्र वाढले आहे.सध्या साठ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. भविष्यात तालुक्यात पाऊस झाला नाही तरी सुलवाडे जामफळ प्रकल्प , प्रकाशा प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती धरण व वाडी शेवाडे धरणात पाणीसाठा करता येईल. तसेच ह्यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट कृषीभूषण शेतकरी इलियास कुरेशी शिंदखेडा राज्यातील पहिले सेंद्रिय शेती करणारे, प्रकाश पाटील पढावद, श्रीराम पाटील चौगाव, भटु पवार वरपाडे यांचा विशेष नामोल्लेख करण्यात आला.
कै.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत 1) कै.मनोहर भास्कर पाटील अमराळे यांच्या वतीने लाभार्थी भास्कर आत्माराम पाटील यांना दोन लाखांचा धनादेश, 2) कै.समाधान राजेंद्र गिरासे चिमठावळ यांच्या वतीने लाभार्थी पुनम समाधान गिरासे यांना दोन लाखांचा धनादेश, 3)अपघात ग्रस्त शेतकरी महेंद्र शांतीलाल गिरासे सुराय यांना दोन लाखांचा धनादेश, 4) राज्य कृषी योजना अवजार बँक मध्ये श्रीमती सुरेखा यशवंत पवार बेटावद यांना नऊ लाख चौरे चाळीस हजार 5) कांदाचाळ श्रीमती रजुबाई सुभाष माळी टेमलाय यांना सत्तेएशी हजार रुपये 6) शेडनेट उभारणी साठी उत्तम निंबा चव्हाण देगाव यांना सात लाख दहा हजार रुपये चा धनादेश वाटप आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.