महाराष्ट्र

धारणी तहसीलमधील नांदुरी गावात अशी होतेय पिण्याच्या पाण्याची नासाडी

धारणी (इंद्रकुमार राजनकर) धारणी तहसीलच्या नांदुरीगावात पाण्याची टाकीची पाईप लाईन फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायतचे सरकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या १५ दिवसांपासून हॅन्डपंप ना दुरुस्ती आहे. उन्हाळा सुद्धा लागला आहे, त्यातदेखील टाकीची पाईप लाईन फुटल्यामुळे पाणी वाया जातं आहे. ग्रामपंचायतच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सागून देखील लक्ष देत नाहीत. तसेच टाकीची पाईपलाईन फुटल्यामुळे रीप्यरींग सुद्धा बरोबर केली नाही. गेल्या एक ते दोन वर्षापासून पाणी वाया जातं आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचत असून रस्त्यात खड्डे पडले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, प्लंबर ही लोक झोपली आहेत का?, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे