राजकीय

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…!

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करतानाच भाजपासोबत मंत्रीपदांबाबत चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन शिंदेंनी केलंय.

 

त्यानंतर पुढच्याच मिनिटाला त्यांनी, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,” असंही आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे.

 

आज म्हणजेच ३० जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा विनियम होण्याची शक्यता आहे. या बंडखोर आमदारांसोबत दुपारी दीडच्या सुमारास भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांचा गट सध्या गोव्यात वास्तव्यास असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाण्याची शक्यात आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे