जळगाव जिल्हा

शिरीषकुमार मंडळातर्फे कोरोना मुक्तीसाठी गणरायाला साकडे

नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नवा भोईवाडा भागातील बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेश जयंती निमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबारसह राज्य आणि देशातून कोरोना मुक्ती व्हावी यासाठी मंडळातर्फे विघ्नहर्ता गणरायाला साकडे घालण्यात आले.

माघी गणेश जयंती निमित्त शहीद शिरिषकुमार मित्रमंडळातर्फे बालवीर चौकात गणरायाच्या भव्य प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे आणि नंदा हिरणवाळे या दांपत्याच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेची महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लाडक्या गणपती बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त बाल गोपाळांनी भक्ती गीतांच्या तालावर ठेका धरला. कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, प्रा. एकनाथ हिरणवाळे,आकाश जवेरी, सिद्धेश नागापुरे, प्रफुल्ल राजपूत, दिलीप कुंभार, नरेंद्र हिरणवाळे, राजेंद्र सोनवणे, आदींसह परिसरातील भाविक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे