गुन्हेगारीचाळीसगाव

लग्नाचे आमिष दाखवून तोतया नवरी व एजंटने केले अडीच लाख लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्न जमवून देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून, तोतया नववधू आणि एजंटने यूवकाकडून २ लाख ४० हजार लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील डामरुण येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास करून तोतया नवरी सह एजंटला अटक केली.

तालुक्यातील डामरुग्ण येथील घनश्याम मुरलीधर पाटील (वय २८) या युवकाच्या घरी २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान संशयित आशा संतोष शिंदे (वय ३१ रा. सुंदरवाडी, जैन शाळे जवळ चिकलठाणा, ता.जि. औरंगाबाद) व किरण भास्कर पाटील ऊर्फ बापु पाटील (वय ४५ रा. आमडदे ता. भडगाव) हे वेळेवेळी आले. त्यांनी घनश्याम याचा विश्वास संपादन केला. दोघांनी घनश्याम कडून २ लाख रुपये रोख व ४० हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज घेतला.
त्यानंतर तोतया नववधू आशा शिंदे पैसे व दागिने घेऊन पसार झाली होती. त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास करत तोतया नववधूसह एजंटला अटक केली आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे