जळगाव जिल्हा

‘गिरणा’तून संक्रांतीला‎ सोडणार दुसरे आवर्तन‎

जळगाव (प्रतिनिधी) गिरणाकाठच्या गावांसाठी गिरणा धरणातून १५ जानेवारीला आवर्तन ‎ ‎ सोडण्यात येणार आहे. पाणी‎ आरक्षण आणि कालवा सल्लागार समितीने यावर्षी गिरणेतून दोनऐवजी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय‎ घेतला आहे. त्यातील दुसरे आवर्तन ‎संक्रांतीला सोडले जाणार आहे.

‎गिरणा धरणातून आता १५‎ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सुटणार आहेत. गिरणेच्या पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव,‎ धरणगाव व अमळनेर तालुक्यातील‎ २२२८१ हेक्टर जमिनीला‎ सिंचनासाठी लाभ होणार आहे.‎ याच तालुक्यांमधील १६० गावांना‎ पिण्यासाठीही लाभ होणार आहे. या‎ अनुषंगाने गिरणा धरणातून आवर्तन‎ सोडण्यात येणार आहे. शेती सिंचन‎ आणि बिगर सिंचनासाठी गेल्या‎ महिन्यात ११०.२९ दशलक्ष घनमीटर‎ इतके पाणी सोडण्यात आले आहे.‎

प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎ जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

१५ जानेवारी रोजी १०६.०४ दशलक्ष‎ घनमीटर इतक्या पाण्याचे दुसरे‎ आवर्तन सुटणार आहे. १ मार्च २०२२‎ रोजी १०६.०४ दशलक्ष घनमीटर‎ आवर्तन सोडण्यात येणार आहे.‎ ‎प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎ जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे